दुबईच्या दोन बड्य़ा कंपन्यांमधील (दुबई वर्ल्ड आणि नाखील) कर्जबाजारी होण्याच्या घटनेने काल व आज जगभरचे बाजार हादरले. त्यात अमॆरिका व काही आशियाई बाजार काल बंद असल्याने मंदीवाल्यांनी या संधीचा फायदा उठवला असे दिसत आहे.अशा प्रकारच्या घटना होतात तेव्हा १-२ दिवस घबराटीमुळेच बाजार पडतात आणि त्यानंतरच त्या घटनांचा खरा अभ्यास होऊन त्यांचे कोठे, कसे आणि किती काळासाठी परिणाम होतील याचा अंदाज बांधला जातो.
आज प्रारंभी आपला बाजार असाच PANIC मध्ये होता आणि दुपारी मात्र तो सावरला. याला दुबई सरकारने दिलेले आश्वासन कारणीभूत होते कि भारतीय कंपन्यांची तेथील गुंतवणूक बर्यापैकी सुरक्षीत आहे असा अंदाज त्यामागे होता ते या घडीला सांगणे कठीण आहे.तुर्तास बाजार सावरला आहे पण जागतिक वातावरण आणखी बिघडल्यास तो पुन्हा खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चित्र स्पष्ट होत नाही तोवर मोठी खरेदी न करता रिअल ईस्टेट व बेंका, केपिटल गूड्स ईत्यादी शेअर टाळावे असे एकंदर सध्या तरी मत व्यक्त होत आहे.
याबबतीत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा-किंवा खालील अड्रेस आपल्या अड्रेस बार मध्ये पेस्ट करा -
साखर कंपन्या आगामी काळात चांगला फायदा करून देतील, तसेच फार्मा व आय. टी. ही सध्या सुरक्षीत वाटत आहेत.पण पुढील आठवड्यापर्यंत वाट बघणे कधीही चांगले.